शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026
महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चीत करण्यात आलेले आहे. राज्य शासनाच्या या धोरणांच्या भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्यसाखळी संवार्धीत करण्याचे नियोजन आहे.
त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
1. वैविध्यपूर्ण फळे व भाजीपाला उत्पादित करण्याचे नियोजन असावे.
2. विक्रीकरिता आणण्यापूर्वी व्यवस्थित वर्गवारी करून, ग्रेडिंग,पकिंग याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक.
3. शेतमालाचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रानिक वजनकाट्याचा वापर करणे अथवा प्रमाणित वजनकाट्याचा वापर करणे बंधनकारक राहील.
4. सदर अभियानाच्या माध्यमातून शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेल्या जागेवर कुणाचेही अतिक्रमण होणार नाही, मालक्की हक्क राहणार नाही.
या अभियानाचे समन्वयक व सनियंत्रक जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक आत्मा व विभागीय उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांनी करावे.
सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायविकास व मत्सव्यवसाय विभाग यांच्यामार्फत दि.१३ नोव्हेंबर २०२० रोजी काढले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२०१११३१२३०५०३८०१ असा आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1
धन्यवाद.....
टिप्पण्या