कैच द रेन अभियान शुभारंभ - पंतप्रधान | catch the rain abhiyan | PRAKRUT INFO

'कॅच द रेन' मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणातील मजकूर 

                               आज माझे भाग्य आहे की मी भारताच्या निरनिराळ्या कोपऱ्यात, निसर्गासाठी, पाण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेसाठी, एका साधकाप्रमाणे गावातील नेते काम करत आहेत. प्रत्येकजण एकमेकाला सोबत घेवून पुढे जात आहे, त्या सर्वांचे ऐकून मला एक नवीन प्रेरणा मिळाली, नवीन ऊर्जा मिळाली आणि मला काही नवीन कल्पना देखील मिळाल्या. मला खात्री आहे की आज ज्या लोकांनी आपल्या प्रतिनिधींचे ऐकले आहे, प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळेलच, मलाही शिकायला मिळाले आहे, आमचे अधिकारीही शिकू लागले आहेत,  लोकांना देखील या अनुभवातून शिकायला मिळेत आहे.

मला आनंद आहे की जलशक्तीबद्दल जागरूकता वाढत आहे, प्रयत्न वाढत आहेत. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने आपण अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जोडले जात आहोत. आज मी मन कि बात मध्ये म्हटल्याप्रमाणे एका मोहिमेची सुरुवात करत आहे, परंतु आज जगासमोर एक उदाहरण मांडण्यासाठी आणि भारतातील पाण्याच्या समस्येवर तोडगा निघावा यासाठी, म्हणून कॅच द रेन या अभियानाची सुरुवात केली जात आहे. 


भाऊ आणि बहिणी

२१ व्या शतकात भारतासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक आहे. पाणी ही प्रत्येक घराची, प्रत्येक क्षेत्राची गरज आहे, जीवन, अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक बाबीसाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे. आज, जेव्हा आपण वेगवान विकासाबद्दल बोलत आहोत, तेव्हा पाण्याच्या सुरक्षेशिवाय, प्रभावी पाणी व्यवस्थापनाशिवाय हे शक्य नाही. भारताच्या विकासाची दृष्टी, भारताच्या स्वावलंबनाची दृष्टी ही आपल्या पाण्याच्या स्त्रोतांवर अवलंबून आहे, हे आपल्या जलवाहिनीवर अवलंबून आहे. दशकांपूर्वी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला या दिशेने बरेच काही करण्याची गरज होती आणि मी गुजरातच्या अनुभवावरून सांगतो की, लोकसहभागातून नियोजित पद्धतीने पाणी वाचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला तर आपल्याला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, पाणी आपल्याला पैशापेक्षा अधिक मौल्यवान सामर्थ्य म्हणून उदयास येईल. पण दुर्दैवाने जेवढे व्यापक प्रमाणावर पाणी विषयात लोकांच्या सहभागाने काम व्हायला पाहिजे, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर हे काम झाले नाही. परिणामी, भारत विकासाच्या वाटेवर जात असताना, जलसंकटचे आव्हान वाढत आहे. जर देशाने पाणी बचतीकडे लक्ष दिले नाही, पाण्याचे शोषण थांबवले नाही तर, येणाऱ्या दशकांत परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडेल आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला पाणी दिले, आपण आपल्या पुढच्या पिढीला पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.यापेक्षा मोठे पुण्य कोणतेही नाही आणि म्हणून आपण हे ठरवूया की आपण पाण्याचा अपव्यय होऊ देणार नाही, पाण्याचा गैरवापर होऊ देणार नाही, आपण पाण्याशी पवित्र संबंध ठेवू. हि आमची पवित्रता पाणी जतन करण्यासाठी काम करेल. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी देशातील सद्य पिढीची आहे. 

आपल्याला सध्याची ही परिस्थितीही बदलावी लागेल आणि आतापासून भविष्यातील संकटांवर तोडगा काढावा लागेल. म्हणूनच, आपल्या सरकारने आपल्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये जल-प्रशासनाला प्राधान्य दिले आहे. गेल्या ६ वर्षात या दिशेने बरीच पावले उचलली गेली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असो वा प्रत्येक शेतीसाठीची 'पाणी मोहीम', 'पे ड्रॉप मोर पीक' ही मोहीम असो किंवा नमामि गंगे मिशन, जल जीवन मिशन असो किंवा अटल भूजल योजना, यासार्वांवर वेगवान काम करीत आहोत. 

मित्रांनो,

या प्रयत्नांच्या दरम्यान आपल्या देशात बहुतेक पावसाचे पाणी वाया जाते ही चिंतेची बाब देखील आहे. भारत पावसाच्या पाण्याचे जितके चांगले व्यवस्थापन करेल तितके जमिनीखालील पाण्यावरचे देशाचे अवलंबित्व कमी होईल आणि म्हणूनच 'कॅच द रेन' सारख्या मोहिम यशस्वी होणे आवश्यक आहेत.यावेळी जलशक्ती अभियानात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश करण्यात येत आहे. मान्सूनला काही आठवडे शिल्लक आहेत, यासाठी आतापासून पाणी वाचवण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. आमच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता असू नये. पावसाळ्याच्या आगमनाच्या अगोदर, टाक्यांचे काम, तलावांची साफसफाई, विहिरींची साफसफाई, मातीची कामे करणे आवश्यक आहे, पाण्याचे संकलन करण्याची त्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे, जर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात त्यांच्या मार्गात अडथळे येत नसतील तर. अशा सर्व कामांसाठी आम्हाला पूर्ण शक्ती वापरावी लागेल आणि यामध्ये फार मोठ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. एक खूप मोठा अभियंता येईल आणि कागदावर एक खूप मोठी डिझाइन बनवू शकेल, त्यानंतर कामाला सुरुवात करू, याची काहीच गरज नाही. खेड्यातील लोकांना या गोष्टी माहित आहेत, ते हे अगदी सहजपणे करतील, फक्त एखाद्याला पुढे येण्याची आवश्यकता आहे, आणि त्यामध्ये तंत्रज्ञान जितके जास्त वापरले जाईल तितके चांगले होईल. आता मनरेगाचा एक न एक पैसा फक्त याच कारणासाठी पाऊस येईपर्यंत खर्च व्हावा.

मनरेगाचे पैसे इतर कोठेही जाऊ नयेत, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, आपणा सर्वांचे सरपंच, सर्व डीएम, डीसी व इतर अधिकारी सहकार्यांची देखील खूप मोठी भूमिका आहे. मला सांगण्यात आले आहे की आज यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, पाण्याची शपथही देण्यात येत आहे. हा पाणी बचत देखील लोकांचा संकल्प झाला पाहिजे, तसेच लोकांचा स्वभाव बनला पाहिजे. जेव्हा आपला स्वभाव पाण्याच्या बाबतीत बदलतो, तेव्हा निसर्गसुद्धा आपल्याला आधार देईल. आम्ही बर्‍याचदा ऐकले आहे की सैन्य शांततेत जेवढा घाम गाळेल तेवढ्ये  युद्धादरम्यान कमी रक्त वाहते. मला वाटतं हा नियम पाण्यावरही लागू आहे. जर आपण पाऊस येण्या अगोदर काम केले कठोर परिश्रम घेतले, योजना आखली, पाणी वाचवले, तर दुष्काळामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते आणि बाकीची कामे थांबली जातात, सामान्य माणूस अडचणीत येतो, जनावरांना पळ काढावा लागतो , हे सर्व वाचेल. म्हणूनच, जसे युद्धात शांततेत घाम गाळणे हा मंत्र आहे, त्याप्रमाणे आपण आपला जीव वाचवण्यासाठी पावसाच्या आधी जितके कष्ट कराल तेवढे चांगले.

भाऊ आणि बहिणी,

पावसाच्या पाण्याचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त , आपल्या देशातील नदीच्या पाण्याच्या व्यवस्थापनावरही अनेक दशकांपासून चर्चा आहे. आपण पाहिले आहे कि, धरण अनेक ठिकाणी बनले आहेत, परंतु डीलिंग करणे अजूनही झाले नाही. जर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काम केले तर त्यात 

 अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण थोडेसे प्रयत्न केले  तरीही पाणी अधिक थांबेल, अधिक दिवस टिकेल आणि त्याच प्रकारे या नद्या, आपले कालवे, या सर्व गोष्टीत फक्त काम करणे आवश्यक आहे. देशाला पाण्याच्या संकटापासून वाचवण्यासाठी या दिशेने वेगवान काम करण्याची आता आपली जबाबदारी आहे. जेव्हा प्रयत्न भगीरथापेक्षा मोठे असतात तेव्हा प्रत्येक लक्ष्य प्राप्त होते. आणि आज आपण हेच जल जीवन मिशन देशात घडताना पाहत आहोत. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मुख्य भाग म्हणजे लोकसहभाग, हे स्थानिक कारभाराचे मॉडेल आहे आणि मी हे सांगेन आणि माझ्या अनुभवावरून मी असे म्हणतो की या जल जीवनात अभियानात माता/बहिणींची संख्या जितकी पुढे येईल, माता/बहिणी जितक्या जास्त प्रमाणात ही जबाबदारी घेतील, जितके माता-भगिनींना पाण्याचे मूल्य समजते तेवढे इतर कोणालाही ते समजू शकत नाही. आई-बहिणींना माहित आहे की जर पाणी कमी असेल तर घरात खूप समस्या आहेत. जर तुम्ही त्या आई-बहिणींना च्या हाती पाण्याची व्यवस्था द्याल, या माता-भगिनी असा बदल करतील ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तुमच्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहेत की असे संपूर्ण कार्यक्रम गावच चालवितो. विशेषत: मी आधी म्हटलं आहे, तशाच प्रकारे, स्त्रियांच्या नेतृत्वात हे अभियान पुढे नेले कि  परिणाम दिसायला लगेच प्रारंभ होतील. मला आनंद आहे की जेथे शाळा, अंगणवाड्या, आश्रम, आरोग्य व कल्याण केंद्र, सामुदायिक केंद्रे आहेत अशा ठिकाणी नळाने प्राधान्याने पाणीपुरवठा केला जात आहे.


जल जीवन मिशन मधील आणखी एक पैलू आहे ज्याची फारच क्वचित चर्चा केली जाते. आपल्याकडे आर्सेनिक आणि इतर प्रदूषकांचे पाणी आहे ज्यामध्ये काही प्रकारचे घटक असतात, ते रासायनिक आहेत, ही एक मोठी समस्या आहे. दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे रोग लोकांचे आयुष्य उध्वस्त करतात, हाडांच्या आजारामुळे जगणेही कठीण होते. जर आपण या आजारांना रोखू शकलो तर आपण बर्‍याच लोकांचे जीव वाचवू शकू. यासाठी पाण्याचे परीक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे. परंतु जर आपण पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाचवले तर उर्वरित शक्ती कमी होईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकार पाणी तपासणीच्या संदर्भात इतक्या गंभीरतेने काम करीत आहे. आणि मला आनंदही आहे की पाणी तपासणीच्या या मोहिमेमध्ये आमच्या गावात राहणाऱ्या बहिणी आणि मुली जोडल्या जात आहेत.केवळ कोरोना कालावधीत साडेचार लाखाहून अधिक महिलांना पाणी परीक्षण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक गावात कमीतकमी 5 महिलांना पाणी परीक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पाणी विषयात  आपल्या माता व बहिणीचा जितके अधिक प्रोत्साहन मिळेल तितके चांगले निकाल आपल्याला मिळतील.

मला विश्वास आहे की लोकसहभागातून आपण देशातील पाण्याची बचत सार्वजनिक शक्तीच्या माध्यमातून करू आणि येणारा काळ आपण उज्ज्वल  बनवू. मी पुन्हा एकदा देशातील सर्व तरुणांना, सर्व माता-भगिनी, सर्व मुले, स्थानिक संस्था, सामाजिक संस्था, सरकारांचे विभाग, सर्व राज्य सरकारांना जल मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन करतो.पुढचे 100 दिवस पाण्याची तयारी अशी करा जसे कि , घरी मोठमोठे पाहुणे येणार आहेत, गावात मिरवणूक निघणार असेल तर मग गाव कसं तयारी करेल? तयारी महिनाभरापूर्वी सुरू होते. हा पाऊस येण्यासाठी संपूर्ण गावात अशी तयारी असावी, पाऊस पाऊस येणार आहे, चला पाणी वाचवूया. या प्रकारची चळवळ सुरू व्हायला हवी. तुम्ही पहा, एक थेंब बाहेर निघणार नाही आणि दुसरे पाणी आले की मग त्याचा गैरवापर करण्याची सवय लागते. मी तुम्हाला विनंती करतो की, जितके पाणी वाचवणे आवश्यक आहे, तेवढेच पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे, आपणही हे  विसरून चालणार नाही.


मी पुन्हा एकदा आज जागतिक जल दिन निमित्त पाण्याविषयीची जागरूकता मोहीम आणि पृथ्वीवर काम करणारे सरपंच, पृथ्वीवरील पाण्यासाठी आपले ध्येय ठेवणारे तरुण, अशा बर्‍याच लोकांशी बोलण्यासाठी आज मला संधी मिळाली, परंतु भारताच्या कानाकोपऱ्यात अशी माणसे आहेत, अशा सर्व शक्तींना नमन करतांना आपण पाण्यासाठी प्रयत्न करू या.आपण पाण्याची बचत करण्यात यशस्वी होऊया आणि पाण्यामुळे आपली पृथ्वी जलमय होईल, पाण्याने आपली अर्थव्यवस्था चांगली होईल, आपण उर्जेने परिपूर्ण राष्ट्र बनून पुढे जाऊया, त्याच कल्पनेने आपले आभार !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर

इ. 1 ली ते 8 वी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर योजना 2026 | ₹165 कोटी मंजूर – शासन निर्णय