मराठीत टिपण्णी : मन की बात 28 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी | Mann Ki Baat Prime Minister Narendra Modi's remarks in Marathi on 28 February 2021 | PRAKRUT INFO
आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं आत्मनिर्भरतेची पहिली अट असते. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल आणि तो त्या वस्तूशी जोडला जाईल तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल. तेव्हा हे एक आर्थिक अभियान राहणार नाही तर ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. संरक्षण साहित्य, मेट्रो कोच आदीची भारतात निर्मिती अशा मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल असे नाही तर भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोच...