पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृषी योजनांसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

 सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येत आहे कि,   एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०-२१ अंतर्गत   https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login  या संकेतस्थळावरील  शेडनेट हाउस  हरितगृह मल्चिंग  ट्रक्टर  प्राथमिक प्रक्रिया केंद्र             अशा विविध योजनांसाठी सुरु असलेले अर्ज भरण्याची ३१ डिसेंबर शेवटची दिनांक आहे. या योजनांसाठी लागणारे कागदपत्रे ७/१२ ८अ बँक पासबुक आधार कार्ड   हि चार कागदपत्रे घेवून आपल्या संगणक किंवा CSC केंद्रावर हा अर्ज आपणास भारता येईल.  ==============================================================    टीम - प्राकृत फूड्स  महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा. https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1  धन्यवाद.....

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

इमेज
सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पिक म्हणून प्रसिद्धी पावले  असून या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेतमध्ये  क्रांती करून शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा केली आहे. गेल्या दोन दशकात या पिकाने क्षेत्र आणि उत्पादनात फार मोठी मजल मारलेली आहे. वर्ष १९-२० मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ३७लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती व ३९ लाख मेट्रिक टनउत्पादन झाले आहे.                                          खरीप २०२० च्या हंगामामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाउस झाला त्यामुळे शारीरिक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले. हेच बियाणे जर येत्या खरीप २०२१ च्या हंगामामध्ये पेरणीसाठी वापरल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता आहे .  त्यामुळे शेतकरी बांधवानी स्वतःसाठी उन्हाळी सोयाबीनचे बिजोत्पादन घेवून पुढील हंगामाकरिता घरच्याघरी दर्जेदार बिजोत्पादन निर्मित्ती करावी. त्या करिता खालील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा....

नाताळ (Christmas) सण शासनाच्या मार्गदर्शक सूचना २०२०

इमेज
 दरवर्षी ख्रिच्क्षण बांधव नाताळाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात . परंतु कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी सर्व धर्मीय सण/ उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने ख्रिच्क्षण बांधवानी नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी. चर्चमध्ये निर्जंतुकिकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनीटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष्य देणे आवश्यक आहे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशुंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी Social Distancing व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतिगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात...

शासकीय कर्मचार्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या मंजुरीबाबत

 शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २८ आजारांवर खासगी रुग्णालयात घेतलेल्या वैद्यकीय खर्चाची वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयांमधील तरतुदींच्या आधीन राहून रु.  ४०००० पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मुंजुरीचे अधिकार सबंधित विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले आहेत. व ४०००० वरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या प्रकरणांना निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयातील वास्तव्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती सर्वसामान्य कक्ष (जनरल वार्ड)                                - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ९५ % सर्वसामान्य कक्षाच्या बाजूचा बाथरूम नसलेला कक्ष - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ९० % बाथरूमसह स्वतंत्र कक्ष                                      ...

शासकीय तांदूळ (धान) खरेदीसाठी ७०० रु. प्रोत्साहनपर शासनाने केले जाहीर सन २०-२१ साठी

 आधारभूत किंमत खरेदी योजना हि केंद्र शासनाची योजना असून ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते व आधारभूत किंमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने शेतकर्यांना हमी किमतीपेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे धान्याची खरेदी करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते टर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी राज्य शासन मान्यताप्राप्त अभिकर्ता संस्थेमार्फत करते.        खरीप हंगाम २०-२१ साठी केंद्र शासनाने धानाची (तांदूळाची) आधारभूत किंमत साधारण धानासाठी १८६८ व अ ग्रेड धानासाठी १८८८ इतकी निश्चित केळी आहे . चालू हंगामात धान उत्पादनाचा खर्च प्रत्येक बाबीत वाढल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे . त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यास प्रोत्साहनपर राशी (paddy procurement Incentive Support ) देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्...

शेळी मेंढी पालनाच्या योजना मोहीम स्वरुपात राबविणेबाबत

 सध्या पारंपारिक पद्धतीने ग्रामीण भागात घरोघरी २-४ शेळ्यांपासून १५-२० या संख्येपर्यंत सरासरी शेळ्या पाळल्या जातात. शेळ्यांच्या मांसाला संपूर्ण राज्यात चांगली मागणी असून मासांचे दर ६०० ते ७०० प्रती किलो असे आहेत. शेळ्यांच्या मासांच्या दारामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये दर उतरण्याचा धोखा दिसून येत नाही तसेच वेळोवेळी संसर्गजन्य रोगाविरुद्धचे लसीकरण केल्यास मरतुकीचा धोका निश्चित कमी होतो. राष्ट्रीय स्तरावर शेळ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा सहावा क्रमांक आहे व मेंढ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. शेळ्यांच्या मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा व्दितीय क्रमांक असून मेंढ्यांच्या मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आहे. या उपक्रमाची उदिष्टे ग्रामीण भागात शेळी पालनाला प्रोत्साहन देणे महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे  महिलांना आर्थिकदृष्ट्याआत्मनिर्भर बनविणे महिलांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे प्राणीजन्य प्रथिनांची उपलब्धता वाढवणे गरजेनुसार मांस उपलब्ध करून देणे या महत्वाच्या उदिष्ट पूर्तीसाठी शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणवर विस्ता...

कृषीपंप वीज जोडणी धोरण - २०२०

इमेज
  दि.०१एप्रिल २०१८ पासून पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण ज्या नवीन कृषी पंप अर्जदाराच्या कृषी पंपाचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आता आहे व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा सर्व नवीन कृषिपंप अर्जदारांना १ महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येईल .ज्या नवीन कृषी पंप अर्जदाराच्या कृषी पंपाचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून २०० मीटरच्या आता आहे व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा नवीन कृषिपंप अर्जदारांना एरियल बंच केबलद्वारे ३ महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येईल. ज्या नवीन कृषिपंप अर्जदाराच्या कृषिपंप चे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा कृषिपंप अर्जदारांना खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध असतील उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास सौर उर्जेवर वीज जोडणी घेता येईल. उच्चदाब वितरण प्रणालीवर (HVDS) वीज जोडणी घेता येईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याकरिता जागेच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नवीन कृषिपंप वीज जोडणी हि सिंगल/थ्...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविणार - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

 राज्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या दोन्ही अंमलबजावणीतील तरतुदी भिन्न असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरूच राहील. राज्यात जवळपास २.२४ लाख असंघटीत व अनोदणीकृत कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. या क्षेत्रातील उद्योजकांना बाहेरून कर्ज मिळत नाही. तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी जास्तीचा खर्च येतो. त्यांच्याकडे आधुनिकीकरणाचा अभाव आहे. तसेच एकात्मिक अन्न पुरवठा साखळी देखील नाही. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी हि योजना राबविण्यात येईल.हि योजना केंद्र व राज्य खर्चाचे प्रमाण ६०:४० अशा तत्वावर चालविली जाईल. तसेच प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित असेल.           यामध्ये उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन बळकट करणे, त्यांना पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया क्षे...

राज्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

  राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठक क्र. ४६ मध्ये दि.०२-१२-२०२० रोजी   झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             काही वस्त्यांची नावे महारवाडा, बोध्द्वाडा, मांगवाडा,ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळीगल्ली अश्या स्वरुपाची नावे आहेत.हि बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने हि नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.             यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे. ...

सार्वजनिक सुट्या - २०२१

 महाराष्ट्र राज्यात वर्ष २०२१ सालासाठी खालील दिवशी शासकीय सुट्या  दि. २६ जानेवारी २०२१    - प्रजासत्ताक दिन दि. १९ फेब्रुवारी २०२१     - छत्रपती शिवाजी महाराज जयंती दि. ११ मार्च २०२१          - महाशिवरात्री  दि. २९ मार्च २०२१         - होळी (दुसरा दिवस) दि. २ एप्रिल २०२१       - गुड फ्रायडे  दि. १३ एप्रिल २०२१    - गुढीपाडवा दि. १४ एप्रिल २०२१    - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दि. २१ एप्रिल २०२१    - रामनवमी  दि. १३ मे २०२१         - रमझान ईद दि. २६ मे २०२१          - बुद्ध पोर्णिमा  दि. २१ जुलै२०२१        - बकरी ईद दि. १६ ऑगस्ट २०२१   - पारशी नववर्ष दिन दि. १९ ऑगस्ट २०२१   - मोहरम दि. १० सप्टेंबर २०२१    - गणेश चतुर्थी दि. १५ ऑक्टोबर २०२१  - दसरा दि. १९ ऑक्टोबर २०२१   - ईद-ए-मिलाद  दि. ४ नोव्हेंबर २०२१  ...