election commission of india | भारत निवडणूक आयोग आणि आधुनिक तंत्रज्ञान | PRAKRUT INFO
भारत निवडणूक आयोगाची स्थापना : दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उपराष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे दोन्ही सभागृह व देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडणुका घेण्याचं काम भारत निवडणूक आयोग पारदर्शकपणे करीत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या एकूण 71 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत निवडणूक आयोगाने असंख्य निवडणुका यशस्वीपणे हाताळल्या आहेत. या 71 वर्षाच्या कालखंडामध्ये तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारताने खूप मोठी प्रगती केली आहे. Electronic Voting Machine (EVM) मशीनचा वापर : भारत हा लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. सन 2019 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशपातळीवर साधारणपणे 911 दशलक्ष इतके पात्र मतदार होते. येवढ्या मोठ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हान भारत निवडणूक आयोगाने आजपर्यंत समर्थपणे पार पाडले आहे. निवडणूक आयोगाने देखील बदलत्या काळाबरोबर निवडणूक प्रक्रियेमध्ये तं...